मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 ची सविस्तर माहित पाहणार आहोत . त्यामध्ये आपण योजनेची उद्दिष्ट्य , अनुदान किती मिळणार, अर्ज कुठे करायचा , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती , अटी , पात्रता, लाभार्थी निवडीचे निकष कोणते या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षात एक लाख पंप बसविण्याचे लक्ष्य आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र,
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022ची उद्दिष्ट्ये –
राज्यातील बरेच शेतकरी शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करतात, त्यामध्ये ते खूप खर्च करतात . त्याचे इंधन खूप महाग आहेत. ही गोष्ट लक्षात घेता , राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ च्या अंतर्गत सुरू केली असून, राज्य सरकार या योजनेअंतर्गत शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार आहेत.
सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप किंमतीच्या ९५ टक्के अनुदान देते. लाभार्थीद्वारे केवळ ५ टक्के रक्कम खर्च केली जाईल. महाराष्ट्र सौर पंप योजना २०२१ च्या माध्यमातून सौर पंप मिळवल्यास उत्पन्नही वाढेल आणि त्यांना जास्त किंमतीचा पंप खरेदी करावा लागणार नाही. हे सौर पंप मिळूनही पर्यावरण प्रदूषण होणार नाही. नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल, डिझेल ची बचत होणार आहे आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्चहि वाचेल. या दृष्टीने विचार करून राज्य सरकारने हि योजना राबवण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र सौर पंप योजना २०२१ मध्ये सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे. जुने डिझेल पंप नवीन सौर पंपामध्ये बदलले जातील. त्यामुळे प्रदूषण हि रोखले जाईल. सिंचन क्षेत्रात विजेसाठी शासनाने दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून हि योजना अमलात आणली
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 लाभ –
या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार २५ हजार सौर जलपंपांचे वितरण करणार असून, दुसर्या टप्प्यात ५० हजार सौर पंपांचे वितरण करणार आहे.आणि तिसर्या टप्प्यात राज्य सरकार २५ हजार सौर पंपचे राज्यातील शेतकऱ्यांना वाटप करणार आहे.
५ एकरपेक्षा कमी शेतजमिनी असलेल्या सर्व शेतकर्यांना ३ एचपी आणि त्या पेक्ष्या जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी सौर पंप या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे यापूर्वी वीज जोडणी आहे, त्यांना या योजनेंतर्गत सौर पंपचा लाभ दिला जाणार नाही.
अटल सौर कृषि पंप योजना पात्रता –
१. लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असला पाहिजे.
२. पाण्याचे स्रोत असलेले शेतकरी या योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत. तथापि, पारंपारिक वीज जोडणी असणाऱ्या शेतक्यांना या योजनेतून सौरपंपाचा लाभ मिळणार नाही.
३. आदिवासी आणि दुर्गम भागातील शेतकरी जे पारंपारिक उर्जा म्हणजेच महावितरण कंपनीचे विद्युतीकरण करीत नाहीत . अशा प्रदेशातील शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
४. जल स्रोतामध्ये नदी, विहीर, स्वत:ची आणि सार्वजनिक शेती तलाव इ. जल स्रोत म्हणून ग्राह्य धरले जातील.
५. ज्या खेड्यांमध्ये अद्याप वनविभागातील एनओसीमुळे शेतकरी विद्युतीकरण झाले नाहीत. अश्या भागातील शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना 2022 आवश्यक कागदपत्रे –
आधार कार्ड
ओळखपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
शेतातील कागदपत्रे
पत्ता पुरावा
मोबाइल नंबर
बँक खाते पासबुक
लाईक करा शेअर करा आणि सबसक्राईब करा


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा